हरतालिकेची कहाणी कथा (हरतालिका तीज व्रत कथा मराठी)
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो.
तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू. लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस.
है तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली.
जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा बाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झाली.
हरतालिका कहाणी ऐका
पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस, इतक्यात तुझा बाप तिथं आलाः त्यांन तुल्ला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.
ज्या ठिकाणी है व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करायं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. घोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.
साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दकिद्रे येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं, ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.
हरतालिका व्रत विधी Hartalika Vrat Katha
- व्रताचा संकल्प – पहाटे स्नान करून व्रताचा संकल्प करावा.
- मातीच्या शिव-पार्वतीची स्थापना – एका स्वच्छ जागी शिव आणि पार्वती यांची मूर्ती स्थापन करावी.
- पूजा विधी –
- गणपती पूजन करून भगवान शंकर आणि माता पार्वतीची विधीवत पूजा करावी.
- बेलपत्र, धतूरा, दुर्वा, फुले, नैवेद्य अर्पण करावा.
- पंचामृताने अभिषेक करावा.
- कथावाचन – हरतालिका व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी.
- जागरण आणि उपवास – संपूर्ण दिवस उपवास करावा आणि रात्रभर जागरण करावे.
- दुसऱ्या दिवशी पारणा – दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानानंतर अन्नग्रहण करावे.
हरतालिका व्रताचे नियम Hartalika Vrat Katha
- या दिवशी अन्न आणि पाणी न घेता निर्जला उपवास केला जातो.
- संध्याकाळी माता पार्वती व भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते.
- महिलांनी या दिवशी एकमेकांना हरतालिका व्रताचे महत्त्व सांगावे.
- काही ठिकाणी पारंपरिक गाणी, भजन-कीर्तन केले जाते.
हरतालिका व्रताचे फायदे Hartalika Vrat Katha
- विवाहित स्त्रियांना सुख-समृद्धी आणि पतीचे दीर्घायुष्य लाभते.
- कुमारिकांना इच्छित वर प्राप्त होतो.
- शिव-पार्वतीच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.
निष्कर्ष Hartalika Vrat Katha
हरतालिका व्रत हे स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे व्रत भक्तिभावाने केल्यास जीवनात शुभ फल मिळते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने इच्छित फलप्राप्ती होते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते.
हरतालिका व्रताच्या शुभेच्छा! 🙏